शतशब्द कथा
----- पैंजण -----
तिच्या पैंजणांचा आवाज आला की, त्याला तिची चाहूल लागायची. कारण, त्याने ते अगदी प्रेमाने भेट म्हणून तिला दिल्याने तो नेहमीचा आवाज त्याच्या कानात वेगळ्याच ध्वनीलहरी निर्माण करायचा. तसं त्यांचं प्रेम घट्ट असल्याने ध्वनीलहरींचं गुपित त्याने एकदा तिला सांगितलं होतं. कधीकधी ती मुद्दाम दबक्या पावलाने यायचा प्रयत्न करायची पण हा बरोबर हेरायचा.
काही कारणास्तव त्यांचं लग्न होऊ शकलं नाही. परंतु तीच पैंजणं अद्यापही तिच्या पावलात असल्याने ती जेव्हा जेव्हा माहेरी यायची ह्याच्या मनाला दिलासा मिळायचा.
नंतर ती अनेकदा माहेरी आली नी गेली पण, ह्याला मात्र काहीच कळालं नाही.
हा चातकासारखी वाट पाहत राहिला.
शेवटी माहित पडलं तिने तिचे पैंजण बदलले आहेत !
@ *सागरराजे निंबाळकर*
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !