रोजचंच येणं जाणं होतं दारातून तिच्या. एक दिवस ताळेबंद घर पाहिलं आणि माहिती काढली असता कळालं, आमच्या प्रेमाची चुणूक घरच्यांना लागल्याने त्यांनी तिचं लग्न मिळेल त्या पुरुषाशी लावून द्यायचं ठरवलं आणि गाव सोडून गेले.
प्रेमात पुन्हा जातच आडवी आली राव !
---------------------------
आयुष्यभर सर्वांशी प्रामाणिक राहिलो, कधी काही चुकीचं केलं नाही, सगळ्यांना निस्वार्थ मदत केली. एकदिवस मुलाच्या महाविद्यालयीन प्रवेशाकरिता एका ठिकाणी गेलो, (जे माझ्या मित्राचंच होतं) मित्राचं वाक्य ऐकून हडबडलो.
*हे कॉलेज तुझ्या मुलासाठी नाही रे, इथं श्रीमंत लोकं शिकतात*.
सर्व केलं. श्रीमंत व्हायचं तेवढं राहिलं बघा !
-----------------------------
पैसे खर्च करायची ऐपत नव्हती म्हणून मित्रांसोबत फिरायला जाणं टाळायचो, वाढदिवसाच्या मेजवाणीत कधी सामील होत नव्हतो, बाहेरच्या दौऱ्याला नानाविध कारणांनी टाळलं.
अचानक आई आजारी पडली. मुंबईला न्यावं लागणार होतं. काय करावं, कसं न्यावं काहीच कळेना !
तेवढ्यात मित्राची चारचाकी दारात येऊन उभी !
तेव्हा कळालं, ही सगळी मित्रमंडळी खरंच श्रीमंत आहेत.
पैशानेही आणि मनानेही !
@ *सागरराजे निंबाळकर*
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !