आटलं धरणाचं पाणी, कोरड्या झाल्या नद्या
आज गेला कसाबसा, काय व्हायचं उद्या
डोळे पांढरे नभाचे, दुभंगली धरणी
सुखी वनराईला, कोणी केली करणी
विरला हा प्राणवायू, कार्बनच्या थराने
ओझोनही फिका पडला, सूर्य किरणाने
तोल पर्यावरणाचा, सांभाळा मिळूनी
अन्यथा हे प्रदूषण, टाकेल गिळूनी
विनवणी अखेरची, करतो निसर्ग
थेंबेथेंबे नष्ट जिणं, आत्म्याचा विसर्ग
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !