# निसर्गाचे चक्र #
पर्यावरणाचा
तोल सांभाळण्या
नकोत काहीही
जास्तीच्या मागण्या
थेंबा थेंबाविना
ओढे, नदी - नाले
आसवांसारखे
सारे शुष्क झाले
सूर्य लालबुंद
आग ओकणारा
मानवाचा हट्ट
त्याला टोकणारा
निसर्गाचे चक्र
पूर्ववत व्हावे
फळे, पाने, फुले
सरींमध्ये न्हावे
वेळीच अताशा
जपू निसर्गाला
राहिले न काही
भान मानवाला
निसर्गाचा धागा
एकसवे जोडू
नको स्वार्थापोटी
तू झाडांना तोडू
वृक्षवल्ली देई
साऱ्या जीवा थारा
झाडांना जगवा
एकमेव नारा
@ *सागरराजे निंबाळकर*
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !