बेधुंद पावसाळा जलधार नित्य येते
तेव्हा निसर्ग हसतो फुलतात सर्व शेते
झालो तुझाच आता काही न शेष माझे
गाली खळी तुझीया ग्वाहीच गोड देते
आई कुशीत घेते तेव्हाच सौख्य लाभे
वाटे खरोखरी मज स्वर्गात माय नेते
झाला असेल अफजल हा ही पवित्र तेव्हा
जेव्हा कुलावतांची छाती कवेत घेते
वैरी म्हणे मला जो तो सांगतो कसा हो
बोलू नकोस उलटे पडतील रोज प्रेते
@ *सागरराजे निंबाळकर*
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !