_मिळते उगाच शिक्षा निर्दोष पापण्यांना_
_आई, वडीलसुद्धा वाटून घेतल्यावर_
_उपयोग काय झाला पोसून लेकरांना_
_येऊन सांजवेळी निघती भल्या पहाटे_
_करता कधी न येतो मुक्काम चांदण्यांना_
_अंधार दूर करती वाटेतला जगाच्या_
_मिळते तरी कमी का? आयुष्य काजव्यांना_
_शर्यत अटीतटीची झाली न एकदाही_
_बघती ससे तरीही पाण्यात कासवांना_
_घुसमट बरीच होते कुंडीत ठेवल्यावर_
_वाऱ्यासवे फुलू द्या बागेतल्या कळ्यांना_
_देतात गारवा जे दुसऱ्यास ऊन झेलत_
_आयुष्यभर स्वतः ते मुकतात सावल्यांना_
_~ सागरराजे निंबाळकर_
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !