थांबवू चोरून आता सांजवेळी भेटणे
जन्मभर मी या उन्हाला जीव आहे लावला
एवढ्यासाठी नकोसे वाटते हे चांदणे
एकटा आहे सुखी मी सोबती कोणी नको
वाटते अवघड कुणाच्या भावना सांभाळणे
शक्य असते जर तुझ्यावर प्रेम करणे नेहमी
टाळले नसते कधीही जीव इतका लावणे
भेटली असती कधीची माधवाला राधिका
कोरले नसते कपाळी जर समांतर राहणे
मी तिचा होऊ न शकलो एकदाही जीवनी
हेच होते, हेच आहे एकतर्फी वाहणे
जे दिले आहेस तेही खूप आहे विठ्ठला
पंढरी झाली घराची पूर्ण झाले मागणे
~ सागरराजे निंबाळकर
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !