-- आता सावराया हवे --
विसरून झाले गेले
आता सावराया हवे
घेण्या आयुष्यात खूप
अनुभव नवनवे
कोण अपुला-परका
वेळोवेळी ओळखावे
भावनेत कुणाच्याही
कधी आहारी न जावे
नको फळाची अपेक्षा
कर्म करत रहावे
आहे नियम जगाचा
ज्याचे त्यानेच पहावे
नाजूकसे समजून
फुल लावले छातीला
त्रास बोचऱ्या काट्यांचा
झाला निष्पाप पाठीला
बोध यातून घेतला
थोडे ठेवावे अंतर
नाही करावी लागत
येथ काळजी नंतर
@ सागरराजे निंबाळकर
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !