▪️थोडे ठेवतो अंतर
नका विचारू त्यावेळी
काय वाटते जीवाला
जेव्हा क्षणात निरोप
द्यावा लागतो कुणाला
तसा सोबती कायम
येथ नसतो कुणीही
मनाजोगे वाटताना
होते काहीही, कधीही
कधी सांगावा एखादा
कधी भेट अचानक
काय बोलावे कुणाला
जो-तो मर्जीचा मालक
चालताना नकळत
सुटलाच कधी हात
कैक होतात जखमा
खोलवर काळजात
म्हणूनच आता मीही
थोडे ठेवतो अंतर
होत नाही मग त्रास
हात सुटल्यानंतर
▪️सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !