का हवी कारणे का हवे दाखले
ज्ञात आहे तुला दुःख जर आतले
शब्द पडले कमी उमगले मग मला
चेहरा वगळता सर्व मी वाचले
भावनाशून्य तू काय कळते तुला
बोलणे हे तिचे खोलवर लागले
तू मला टाळते मी तुला टाळतो
यामुळे वाढले वाद दोघातले
जात नाही कधी तोल प्रेमात या
खाचखळग्यातही भान जर ठेवले
◼️सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !