रडता न आले हसता न आले
आयुष्य इतके बेरंग झाले
चेष्टाच आहे नशिबी तुझ्यातर..
हासून मिश्किल भटजी म्हणाले
कवटाळले मी ज्यांना उराशी
काट्यांपरी ते घातक निघाले
आयुष्य म्हणजे केवळ पसारा
आहे खरे हे.. उशिरा कळाले
बापात विठ्ठल आईत रखुमा
नशिबास दोन्ही आंदण मिळाले
@ सागरराजे निंबाळकर, कल्याण
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !