पुढे जायचे असल्यास मुखी गोडवा हवा
याच कारणे शोधत आहे मी मार्ग नवा
"कळपात रहा" सुचवले मला ज्याने-त्याने
उठता-बसता मिळते जिकडे फुकट वाहवा
कविता लिहिल्या लिहिल्या गझला जमतील तशा
मनात स्मरून कधी सूर्य तर कधी चांदवा
उपासमारी कायम असते नशिबी माझ्या
भुकेवर पुन्हा बोलू.. सध्या, दिवे मालवा
विकला आहे ऐंशी टक्के देश तसाही
त्यावर फतवा लाज स्वतःची स्वतः वाचवा
🌿 सागरराजे निंबाळकर, उल्हासनगर
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !