वाटा कुण्या फुलांचा नव्हता सुखात माझ्या
दुष्काळ सावल्यांचा पाहून बारमाही
आले कधी न कोणी दारी उन्हात माझ्या
लावू कशास माळा चोहीकडे दिव्यांच्या
करते उजेड जर का पणती घरात माझ्या
वरवर तसा तुला मी कळणार फार नाही
जाणून पूर्ण घेण्या डोकाव आत माझ्या
डोळ्यांत आसवांचा येतो प्रलय कधीही
वाहून खूप काही जाते स्वरात माझ्या
पटले मनास जेव्हा मी पाहुणा क्षणांचा
उरली न कोणतीही इच्छा मनात माझ्या
~ सागरराजे निंबाळकर
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !