मनाचा गाठताना तळ जराशी घे खबरदारी
तिथे लागेल चकवा ये पुन्हा परतून माघारी
मला सुटले न कोडे हे कधीही आजतागायत
थबकती पावले माझी अजूनी का तुझ्या दारी
पित्याने वाटणी केली खरेतर याचसाठी की..
खबर मिळताच गेल्याची मुले लढतील परभारी
मला तू शोधले केवळ घराच्या अंगणामध्ये
दिवसभर मी उभा होतो तुला पाहत परसदारी
निजवतो नाइलाजाने उपाशी लेकरे माझी
मला फळली न यंदाही विठूराया तुझी वारी
सागरराजे निंबाळकर, कल्याण
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !