~~ विचार बदलू ~~
छोट्या-छोट्या, प्रश्नांनीही
होतो जेव्हा गोंधळ
तोल मनाचा, सावरताना
मिटून घ्यावी ओंजळ
क्षमा, याचना, शिक्षा, सुटका
मोठा प्रवास सारा
शांत, संयमी वृत्ती ठेवत
चढू न द्यावा पारा
पुनरावृत्ती, टाळत आता
विचार बदलू थोडे
कठीण असले, जरी कितीही
क्षणात सुटते कोडे
🌿 सागरराजे निंबाळकर, कल्याण
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !