प्रेम कवितेपरी रोज सुचतेस तू
भान सुटले तरी तोल जातो कुठे
हात माझा असा घट्ट धरतेस तू
बांधला बंगला एक नावे तुझ्या
खंत इतकीच की त्यात नसतेस तू
जीवनाचा खरा अर्थ कळला तुला
दुःख होऊनही गोड हसतेस तू
तोड तू बंधने मोकळी हो जरा
का उगा आतल्या आत झुरतेस तू
~ सागरराजे निंबाळकर
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !