------- जगून झाले -------
उरले अता न काही सारे बघून झाले
नव्हते करायचे जे तेही करून झाले
मरणास पाहिले मी तेव्हा कुठे कळाले
(सारेच वाद माझ्या जगण्यावरून झाले)
भावार्थ मांडताना पुरतात दोन ओळी
सोडव तिढा तुझा तू माझे लिहून झाले
चिंता अता न काही येवो मरण कधीही
ठरले जगावयाचे तितके जगून झाले
नुकसान होत नाही दारूमुळे कधीही
देशात राजकारण पाण्यावरून झाले
@ सागरराजे निंबाळकर
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !