झालेत लाड माझ्या हातून यातनांचे
असली जरी कितीही सोज्ज्वळ दिसायला ती
उध्वस्त फार केले जीवन तिने मुलांचे
होतेय वाढ झटपट इतकी कशी कळेना
आहे तरी कितीसे आयुष्य वेदनांचे
छळतो मनास माझ्या हा प्रश्न एवढा की..
जाळून कोण जातो घर रोज सावल्यांचे
करतो गुन्हा खुल्याने जामीन घेत सुटतो
उरले न भय कुणाला सज्ञान कायद्यांचे
झाला क्षणात नाही खारट उगाच सागर
केलेत रोज प्राशन अश्रू नद्या-नद्यांचे
~ सागरराजे निंबाळकर
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !