आयुष्याच्या, वाटेवरती
पडझड कायम, होतच असते
सावरण्याला, पुन्हा नव्याने
केवळ थोडे, धैर्य लागते
हरूनही जो, जिंकत जातो
सलाम करते, दुनिया त्याला
भाग्यासोबत, कर्मही हवे
ध्येय गाठतो, कळते ज्याला
रडणे-हसणे, पडणे-उठणे
आयुष्याचा, खेळ निराळा
आनंदाला, कवेत घ्या अन्
दुःखाला या, नकळत गाळा
छळले जर का, एकांताने
विविध रसांची, गाणी गावी
हवा कशाला, पत्ता कुठला
लिहू एकदा, पत्र निनावी
~ सागरराजे निंबाळकर
No comments:
Post a Comment
आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार !